HW News Marathi
महाराष्ट्र

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, राऊतांची राज्यपालांवर टीका

मुंबई | महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना, राज्यातील राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!, असे ट्वीट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरी टीका केली आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरून संजय राऊत यांनी राज्यापालांवर निशाणा साधला.

संजय राऊतांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की,राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!, अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. कोरोनामुळे सर्व निवडणुका लांबणीवर गेल्या असून निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन, NDRF तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

Aprna

राजकारणात परस्पर विरोधी असणारे मुंडे बहीण भाऊ लातूरमध्ये आले एकत्र!

Aprna

“या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही होणार?”, फडणवीसांचा पवारांना सवाल

News Desk