HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”; अतुल भातखळकरांची टीका!

मुंबई। राज्यभरात अतिशय उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. आज अनंत चुतर्थी असून राज्यात ठिकठिकाणी गणरायाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, अशा असा जयघोष करत गणेशभक्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असते, येथील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गणेशोत्सवात पुण्यात येत असतात. दरम्यान, आज (रविवार) पुण्यात मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. या घटनेवरून आता भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत. खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही.” असं अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.तर, पोलिसांनी गणेशमंडळाचे साहित्य जप्त केल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद देखील झाला होता. यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यावर मंडळास पोलिसांनी साहित्य परत केले.

नेमकं काय झालं –

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन केलं जात आहे. सकाळी ११ वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केलं जाणार होतं. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर करण्यात आली होती. यावेळी तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलीस तिथे पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचं साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परवानगी नसतानाही वादन केले जात असल्याने कारवाई केल्यानंतर गोंधळ उडाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुनगंटीवारांची नाराज पोलिसांना साद, दबावाखाली न येता राज्यपालांकडे तक्रार करण्याचे आव्हान

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत पोहचले रिलायन्स रुग्णालयात

News Desk

राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk