HW News Marathi
महाराष्ट्र

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो” – मुख्यमंत्री

मुंबई। देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मी शाळेत सुद्धा बेस्ट बसने गेलो होतो

मुख्यमंत्री म्हणाले, “1874 ते 2021 हा बेस्टचा मोठा प्रवास आहे. पहिली बेस्ट ही घोडगाडीत होती. अजून ट्रामच्या आठवणी आहेत. मला माँ आणि बाळासाहेब ट्राममधून फिरायला घेऊन जात असत. पुढे यात बदल होत गेले. आता ही इलेक्ट्रिकल बस आली आहे. मी शाळेत सुद्धा बेस्ट बसने गेलो होतो. बेस्ट ही सेवा देत आहे”.

बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद

मुंबईकराचा बेस्ट आणि लोकल रेल्वेशी संबंध येतो. बेस्ट ऊन वारा पावसात सुरू असते. कोरोनाकाळात बेस्टने उत्तम काम केलं. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद. आदित्यने सांगितलं की आपल्या वचननाम्यात आम्ही म्हटलं होतं एकच तिकीट सगळ्यांसाठी पाहिजे. बेस्टची एक तिकीट सिस्टिम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोमध्ये एकच तिकीट चालू शकेल. लोकलबाबत विचारणा होत आहे , चावी आपल्याकडे आहे, ती किती फिरवायची हे आपल्या हातात आहे, लोकल सुरू करायचा आहेत, हॉटेल सुरू करायच्या आहेत. यांची चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची असं मुख्यमंत्री म्हणाले.

रेस्टोरंट सुरू करण्याबाबत दोन पाच दिवसांमध्ये कळवलं जाईल

हॉटेल, लोकलबाबत लवकरच निर्णय

हॉटेलवाले काल भेटले , तेव्हा त्यांना म्हटलं की थोडं धीराने सर्व हळूहळू खुले करू. लोकल आणि रेस्टॉरंटबाबत लवकर निर्णय घेऊ. कोरोना उलटणार नाही ना यामुळे खबरदारी घेतोय. लोकल रेस्टोरंट सुरू करण्याबाबत दोन पाच दिवसांमध्ये कधी काय सुरू करायचा याबाबत निर्णय सरकारकडून कळवळा जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई बसचे लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण पार पडलं. यावेळी बेस्टच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो… कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही…जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एनआयए’ला आत्मसमर्पणापूर्वी डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी भारतीय लोकांसाठी लिहिलेले खुले पत्र

News Desk

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन

News Desk

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Aprna