HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाही राहिली का?याचा देशाने विचार करणे गरजेचे, राऊतांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई | लोकशाही राहिली का?, याचा आता देशाने विचार करणे गरजेचे आहे, असा सवाल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “राजकीय हेतूने कारवाई केली आहे. संजय राऊतांवर झालेले कारवाई ही बदलाच्या भावनेने झालेले दिसून येत आहे. देशात लोकशाहीचे नाही दबावाचे वातावरण आहे. भाजपचे नेते आता उघड धमक्या देत आहेत, अशी टीकांनी त्यांंनी भाजपवर केली आहे. आदित्य ठाकरे हे पुण्यात पर्यायी इंधन परिषेदेसाठी आज (५ एप्रिल) सहभागी झाले होते. आदित्य ठाकरेंनी ईडीकडून संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

आदित्य ठाकरे म्हणाले, “आपल्या देशात जे काही सुरू आहे हे लोकशाहीचे वातावरण नाही. हे दबावशाहीचे वातावरण आहे. तुम्ही भाजपसोबत गेला नाही, त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्या ठाकरेंना विचारल्यावर ते म्हणाले, अशा जर धमक्या येऊ लागल्या तर या देशात लोकशाही आहे का?, याचा विचार करण्याची गरज आहे. परवाच्या एखाद्या जाहीर सभेत कोणी तरी एका पक्षाला मतदान नाही केले. तर तुमच्या मागे ईडी लावू. लोकशाही राहिली का?, याचा आता देशाने विचार करणे गरजेचे आहे. शिवसेना ही एकजुटीने विरोधकांना दिसेल.” 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडी अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीने राऊत आणि त्यांच्या मंत्रिपरिवारची जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवानंतर मुंबईत ‘विघ्न’? कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका!

News Desk

रामा पोतरेंच्या कुटबियांना ५ लाखाचा धनादेश

News Desk

“तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत”, फडणवीस अजित पवारांवर भडकले  

News Desk