HW News Marathi
महाराष्ट्र

देश गरिबी महागाई मंदीच्या तिरडीवर ! गुजरातमध्येच पैशाचा पाऊस कसा ?

उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टिका

मुंबई – सारा देश गरिबी, महागाई, बेरोजगारी आणि मंदीच्या तिरडीवर तडफडत असताना गुजरातमध्ये पैशाचा पाऊस कसा असा खोचक सवाल शिवसेनेनं भाजपला केला आहे. विरोधकांना गुजरातमध्ये पैसे देवून विकत घेतले जात आहे. या भाजपच्या भूमिकेवर सामनातून जोरदार टिका केली आहे. टिकेचा मुख्य रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. मोदींनी गुजरातचा विकास केला असा नेहमीच गवगवा केला जातो. त्यांनी विकासाचे नवे नवे प्रयोग केले. मग आता पैशाने विरोधकांनी विकत घेण्याचा हा नवा प्रयोग कशासाठी असा प्रश्नही उद्धव यांनी संपादकीयमधून विचारला आहे. सत्ता आणि पैशाच्या जिवावर भाजप घोडे बाजार करत आहे. पटेल आंदोलनाची बोली लावली जात आहे. त्यांच्या नेत्यांना कोट्यवधी रूपये दिले जात आहे. या सर्व प्रकरणांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली. शिवाय यावेळी त्यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना लक्ष करत मुंबईतील भाजपचे ईडी स्पेशलीस्ट त्यांनी गुजरातमध्ये जावे आणि जो घोडेबाजार तीथे सुरू आहे त्याच्या चौकशीची मागणी करावी असे आव्हानच त्यांना दिले आहे. मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत प्रवेश केला. तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शाह यांनी भारताच्या मुलीचा मान राखला, कंगनाने मानले आभार!

News Desk

टिव्हीच्या नेटवर्क मध्ये राहणाऱ्यांना जनतेचे नेटवर्क काय कळणार? अजितदादा भाजपवर भडकले

News Desk

“राज ठाकरे यांच्या मताशी सहमत!”, प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना पाठिंबा

News Desk