HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस संपले – शाहू छत्रपती

कोल्हापूर – आजवर राज्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या उन्नतीकरिता जेवढे लक्ष द्यायला हवं होतं, तेवढं दिलं नाही. आता मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राज्यकर्ते आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, ही भूमिका घेऊन आज मराठे लढत आहेत. पाणी गळ्यापर्यंत आले आहे. यापुढे मराठा समाज सहन करण्याच्या स्थितीत नाही. कायदे बदलून आरक्षण द्यावेच लागेल. तोपर्यंत मराठा समाजाचा राग शांत हाणार नाही, असा इशारा कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांनी दिला.

भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रत्येक राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरले. सर्वच क्षेत्रात होत असलेल्या पिछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा हा आक्रोश रास्तच आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी आणि शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व्यापक धोरण सरकारने ठरवावं. केंद्रात आणि राज्यात आता तुमचेच सरकार आहे. घोषणा करून, वटहुकूम काढून चालणार नाही. त्यासाठी कायद्यातच बदल करायला हवा. यासाठी विधिमंडळ, संसदेत एकत्रित बसून कायदा तयार करा, असेही शाहू म्हणाले.

मराठ्यांच्या प्रगतीचे, सर्वांगीण विकासाचे मार्ग खुंटले आहेत. शासकीय नोकऱ्यांत, शिक्षण क्षेत्रात, उद्योग व्यवसायांत,शेतीमध्ये मराठा समाज अडचणीत आला आहे. या सर्वाला केवळ शासकीय धोरणे जबाबदार आहेत. आमच्या प्रगतीचे मार्ग तुम्ही बंद केलेत, आमचं काय चुकलंय? याचा जाब मराठा समाज संघटितपणे विचारतोय, असेही मत शाहू यांनी व्यक्त केले. आजमुंबईत मराठा समाजाचा मोर्चा निघाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकराला खडे बोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता!  

News Desk

गजानन काळेंच्या पत्नी थेट कृष्णकुंजवर!

News Desk

राज्याच्या विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प ! – नाना पटोले

Aprna
महाराष्ट्र

मन हेलावणारी पोलीस भरती

News Desk

अमरावती येथील पोलिस मुख्यालय मैदानावर शनिवारी मन हेलावणारे चित्र पोलिस भरतीदरम्यान दिसून आले.धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रिती कुमरेही सव्वा वर्षाच्या‘परी’ला घेऊन भरतीसाठी आली होती.

पोलिस मुख्यालयाच्या शंभर मीटर धावण्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रिती यांची आठशे मीटर चाचणीसाठी निवड झाली.या चाचणीपूर्वी तिने आपली‘परी’महिला पोलिसांच्या स्वाधीन केली धावण्याच्या चाचणीसाठी सज्ज झाली.दरम्यान,‘परी’ला आई दिसल्याने ती रडायला लागली.पोटासाठी एकीकडे चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी प्रिती जीव तोडून धावत होत्या.परंतु त्यांची नजर मात्र सतत रडणाऱ्या‘परी’कडे भिरभिरत होती.

Related posts

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

News Desk

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, EDचा मोठा खुलासा

News Desk