HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर आज होणार सर्वोच्च न्यायालयात फैसला

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला बहुमताचा दावा करणारे पत्र आज (२५ नोव्हेंबर) सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात काल (२४ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान विधीमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. या प्रकरणावर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

या सुनावणीदरम्यान बहुमत सिद्ध करण्यासाठी तातडीचे अधिवेशन बोलाविण्याचे कोणतेही आदेश न्यायालयाने दिले नाहीत. न्यायालयात याप्रकरणी जवळपास ५० ते ५५ मिनिटे सुनावणी सुरू होती. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शनिवारी (२३ नोव्हेंबर) यांनी शपथ घेतली. यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिनवारी सकाळी ५. ४७ मिनिटाने राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणली. राज्यपाल आणि भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देणारी याचिका काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या सुनावणीदरम्यान २८८ आमदारांपैकी बहुमताचा आकडा आमच्या तीन पक्षाकडे आहे. २२ नोव्हेंबरच्या रात्री तीन पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत होती असा घटनाक्रम त्यांनी न्यायालयात सांगितला. तर राष्ट्रपती राजवट ५.४७ मिनिटांनी हटविण्यात आलं. कॅबिनेटच्या मान्यतेशिवाय राष्ट्रपती राजवट कशी हटविण्यात आली? असा सवाल त्यांनी न्यायालयात महाविकासआघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी उपस्थिती केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाजूने सरकरी वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मणू सिंघवी बाजू मांडत होते. तर मुकुल रोहतगी भाजपकडून बाजू मांडत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून विधान परिषदेसाठी डच्चू ; तर पंकजा मुंडे म्हणतात…

News Desk

काँग्रेस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, २ दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली!

News Desk

सिंचनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यातील कृषी विकास दर १२ टक्के – मुख्यमंत्री फडणवीस

News Desk