HW News Marathi
महाराष्ट्र

बंद असलेल्या साई रिसॉर्टची ईडीकडून चौकशी; कारवाईनंतर अनिल परबांची माहिती

मुंबई | बंद असलेल्या साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरून ईडीने चौकशी केली, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीने त्यांच्या घरी आणि शासकीय निवासस्थानी छापेमारी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ईडीच्या पथकाने तब्बल साडेतेरा तास अनिल परबांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातून बाहेर पडली. यानंतर अनिल परबांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परब म्हणाले, दापोली येथील साई रिसॉर्ट हे त्यांच्या मालकीचे नसून ते रिसॉर्ट बंद असून देखील ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. साडपाणी आणि मनी लॉड्रिंगचा काय संबंध असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. आणि ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले असून यापुढे देखील त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  ईडीने आज (२६ मे) सकाळी अनिल परबांच्या यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी ‘अजिंक्यतारा’ येथे छापे मारले आहे. तसेच मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडी छापे टाकल्याची माहिती एएनआयने दिली आहे. ईडीने अनिल परब यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी ‘अजिंक्यतारा’ येथे छापे मारले आहे. तसेच मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडी छापे टाकल्याची माहिती एएनआयने दिली आहे. ईडीच्या या कारवाईने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते.

अनिल परब म्हणाले, “माझ्या शासकीय निवासस्थान, माझ्या घरावर आणि माझ्याशी संबंधित काही लोकांवर ईडीने आज छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बातम्या सतत येत होत्या. आणि माझ्यावर ईडीची कारवाई होणार अशा सतत बातम्या येत होत्या. या मागचा गुन्हा काय?, हे तपासल्यानंतर लक्ष्यात आले. दापोली येथे असलेले साई रिसॉर्ट जे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की, हे साई रिसॉर्ट यांचे मालक सदानंद कदम आहेत. आणि सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टचे मालकी हक्क सांगितला आहे. न्यायालयात देखील सदानंद कदम यांनी तसा दावा केलेला आहे. त्याचबरोबर सदानंद कदम यांनी त्यांच्या खर्चाचे सर्व हिशोब आयकर विभागाला दिलेले आहेत. आणि काही दिवसांपूर्वी सदानंद कदम यांच्यावर आयकर विभागाने त्यांच्यावर छापे देखील मारला आहे. हे सर्व असताना हे रिसॉर्ट असूनही चालू आणि काम पूर्ण झालेले नाही. पर्यावरणाची दोन कलमे लावून, या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रा जाते, अशा प्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनमध्ये नोंदविला आहे. जे रिसॉर्ट चालूच नाही. या रिसॉर्टसंदर्भात प्रदुषण महामंडळाने रिपोर्ट दिलेला आहे. प्रांत आणि पोलिसांनी रिपोर्ट दिलेला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, साई रिसॉर्ट चालू नाही. तरी देखील माझ्या नावे आणि साई रिसॉर्टच्या नावाने अशा प्रकारची नोटीस काढली गेली. आणि एक तक्रार दाखल केली गेली. आणि त्या तक्रारीवरून आज माझ्या घरी आणि शासकीय निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. याआधी देखील मी म्हटले की, कोणतीही यंत्रणा मला जे काही प्रश्न विचारतील. त्यांना उत्तर देण्यास मी बांधील असून यापूर्वी देखील मी उत्तर दिलेली आहे. आज सुद्धा मी ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. तसेच यापुढे देखील ईडीने मला प्रश्न विचारले तर मी उत्तर देण्याची माझी तयारी आहे. 

तुमच्यावर झालेली कारवाईही सुडबुद्धीने झालेली आहे, या प्रश्नावर परब म्हणाले, “बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी जर जात असेल तर यात मनी लाँड्रिंगचा विषय आलाच कुठे?, असा उलट सवाल त्यांनी केला आहे. परब पुढे म्हणाले, “त्यामुळे या सर्व गोष्टींचा खुलासा न्यायालय आणि चौकशीनंतर होईल. मी चौकशीला समोरे गेलेलो आहे. आणि यापुढे देखील चौकशीला समारे जाण्याची माझी तयारी आहे. मी प्रत्येक गोष्टी कायद्यालासमोर ठेवून बघत असतो. त्यामुळे मला माहिती आहे की कायद्यांव्यक्त काय होऊ शकतो. आणि आता त्यांच्या पाठीमागे काय अर्थ काढायचे ते वेळ आल्यावर बघू. ईडीची चौकशी होती ती फक्त साई रिसॉर्टसंदर्भात होती. “

रिसॉर्डचा संबंध नसलेल्या लोकांवर देखील ईडीने छापे मारले

ईडीने केलेली चौकशी ही मनी लाँड्रिग प्रकरणाशी होती, असा सवाल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. असा कोणताही रिपोर्ट कोणी दिलेला नाही. आयकर विभागाचे रिपोर्ट अजून येईचे आहे. यामुळे यासर्व पेरलेल्या बातम्या आहेत. यासंदर्भात सर्वांचे रिपोर्ट येतील. त्यावेळी सत्य बाहेर येईल.” या चौकशीदरम्यान ईडीने काही कागदपत्रे घेतली, या प्रश्नावर अनिल परब म्हणाले, “ईडीने जी काही कागद पत्रे घेतली. आणि मी काही कागद पत्रे दिली. बाकी ईडीने काही जप्त केलेले नाही. आज ज्या लोकांच्यावर छापे पडले त्यांच्या रिसॉर्डशी किती संबंध आहे. परंतु, कारवाई झालेली आहे. आणि या कारवाईचे आम्ही योग्य उत्तर देऊ.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा दाखल!

News Desk

ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू! – सुप्रिया सुळे

Aprna

“… तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”, धनंजय मुंडे प्रकरणाने राजकारण पेटलं 

News Desk