HW News Marathi
महाराष्ट्र

पंचगंगेच्या नदीपात्रात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 

कोल्हापूर | पंचगंगा नदीच्या नदीपात्रात महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध करत नदी किनारी जागतिक फुटबॉल स्पर्धा शिये येथील हनुमान नगर पंचगंगा पुला खाली नदीपात्रात भरवली. यावेळी अनेक फूटबॉल खेळाडू उपस्थित होते. दिवसेंदिवस पंचगंगेचे पाणी विषारी होत आहे. या नदीच्या पाण्यात सांडपाणी,मैला सोडला जातो , नदी किणारी असलेल्या कारखाण्यांचे दूषित पाणी देखील या नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित झाली असून जलपर्णीमुळे नदीची आताची स्थिती क्रीडांगणासारखी झाली आहे. याला जबाबदार फक्त कोल्हापूर महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ असल्याचे म्हणत या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसैनिकांनी महापालिकेच्या व प्रदूषण नियंत्रण महामंळाच्या विरोधात जोरात घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे याच्या नेतृत्वाखाली अनेक लोक सहभागी झाले होते. या ठिकाणी असलेल्या दूषित पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड,क्षेत्र अधिकारी. संजय मोरे अविनाश कडले यांना घेण्यासाठी शिवसेना पदाधिकऱ्यानी भाग पाडले. त्यामुळे त्यांनी परिक्षणासाठी यावेळी पाण्याचे नमुने देखील घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी, संधी मिळताच आडवं करावं !

News Desk

काहीच कल्पना न देता राजभवनात बोलविले !

News Desk

७ नोव्हेंबरला मातोश्रीवर मराठा क्रांती मोर्चाचा मशाल मोर्चा!

News Desk
देश / विदेश

प्रमोद मुतालिक यांनी केली गौरी लंकेश यांची कुत्र्यांशी तुलना

News Desk

मुंबई | काँग्रेसच्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ हत्या झाल्या होत्या. तेव्हा काँग्रेस सरकार शांत होते. त्यावेळी मात्र कोणीही काँग्रेसला प्रश्न विचारला नाही. परंतु गौरी लंकेश यांच्या मृत्यूनंतर मोदी गप्प का? असा सवाल सर्वजण उपस्थित करत आहेत. पंतप्रधान मोदींनी या बद्दल का बोलावे ? म्हणजे कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला, तर त्यावर मोदींनी प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही का करता ?, असे वादग्रस्त विधान श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले आहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी परशुराम वाघमारे याने गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणी कर्नाटकच्या एसआयटीने महाराष्ट्रातून परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. धर्माच्या रक्षणासाठी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुरामने दिली असल्याचा दावा कर्नाटकच्या एसआयटीने केला आहे.

संबंधित बातम्या – धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

Related posts

बिफ प्रकरणी पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

News Desk

रोड शोदरम्यान पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली

News Desk

सातारा, कागल रस्ता रुंदीकरणासाठी तीन हजार कोटी

News Desk