HW News Marathi
महाराष्ट्र

लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले!

मुंबई | राज्यात यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनहे मुंबईत सुरू आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत आहे. लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले आहेत,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटलांनी आज (२४ डिसेंबर) विधिमंडळात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, “हिवाळी अधिवेशन अजून काही दिवस चाले पाहिजे. कारण अजून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. एसटी कर्मचाऱ्याच्या प्रश्नाचे काय करणार आहेत. पेपर फुटीच्या प्रश्न, शेतकऱ्यांचा विमा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे काय करणार आहेत. विजेची बिले न भरल्यामुळे, खोटी बिले आणि चुकीचे बिले आल्यामुळे ते थांबवणार आहेत का?, या प्रश्नासंदर्भात कोणत्याच प्रश्नाचे सरकारकडून उत्तर मिळालेले नाही,” असे अनेक सवाल पाटलांनी उपस्थित केला.

ओबीसी आरक्षणासंदर्भात नेमके काय करणार आहेत. यामुळे अजून काही दिवस हिवाळी अधिवेश वाढवले पाहिजे, अशी मागणी पाटलांनी आज माध्यमांशी बोलताना केले आहे. सरकारला फक्त ३२ हजार कोटीच्या मागण्या मान्य करू घेणे, हाच त्यांचा उद्देश असल्याचा टोला पाटलांनी लगावला आहे. तसेच १९ विधेयक मंजूर करून घेणे आणि शक्य झाले तर विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक पार पाडणे हेच महत्त्वाचे उदिष्ट या सरकारचे असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

अधिवेशनाचा कालावधी वाढवा

“अधिवेशन हे एक-दोन आठवड्यासाठी वाढविले पाहिजे. दर वेळी अधिवेशन लवकर उरकणे हे लोकशाहीला धरून नाही. लोकशाहीची पायमल्लीच करण्याचे सरकारने ठरविले आहेत. त्याप्रमाणे सरकार नियम समितीमध्ये नियम बदला, जे वर्षानुवर्षे गुप्त मतदानानुसार अध्यक्ष ठरविण्याची पद्धत आहे. आता ते ठरावाने अध्यक्ष ठरवणार आहेत. कामकाज सल्लागार समितीमध्ये सोमवार-मंगळावरी विधानसभेच्या अध्यक्ष निवडतात की,” अजूनही एकमत नसल्यामुळे थांबतात, असे पाटलांनी म्हटले 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते वाजपेयी आणि नेहरू”- नितीन गडकरी

News Desk

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शन १७ जानेवारीला

swarit

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

News Desk