HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपतींचे नाव असलेल्या योजनेतही शासनाचा घोटाळा

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 14,388 कोटी कर्जाचे वाटप केले. परंतु 46.52 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याची माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआय ने उघडकीस आल्यामुळे सध्या एकूण कर्जवाटपावर प्रश्न उपस्थित होत आहे.

अनिल गलगली यांनी शासनाकडे राज्यातील कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची माहिती मागताना एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची माहिती जिल्हानिहाय मागितली होती. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी अशी माहीती शासन स्तरावर उपलब्ध नसल्याचे गलगली यांना सांगितले.

वाटप केलेल्या निधीची शासनाकडे जिल्हा निहाय आणि गाव निहाय माहिती उपलब्ध नसणे ही यंत्रणेतील मोठी चूक आहे. ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत. त्यांचा प्रत्यक्षात सम्मान केला गेला की नाही याची शहानिशा करण्याचे मार्ग शासनाने स्वतः बंद केल्याची टीका करत अनिल गलगली यांनी जिल्हा निहाय आणि गाव निहाय जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना द्यावेत अशी मागणी केली आहे.

गलगलींना उपलब्ध झालेली ३६ जिल्ह्यांची माहीती खालीलप्रमाणे

  • योजने अंतर्गत दाखल अर्ज- 56,59,159
  • अहमदनगर – 3,34,920 दाखविण्यात आलेले अर्ज 14,797
  • मुंबई उपनगर- 1620
  • मुंबई शहर – 23715
  • राष्ट्रीयकृत बँकेत मंजूर खाते 19,88,234
  • राष्ट्रीयकृत बँकेत दिलेली रक्कम 77,66,55,13,440. 76
  • राष्ट्रीयकृत बँकेने वाटप केलेली रक्कम 75,89,98,20,857. 28
  • डीसीसी बँकेतील मंजूर खाते- 26,64,576
  • डीसीसीला दिलेली रक्कम 67,70,18,88,772. 36
  • बॅंकेने लाभार्थ्यांना वाटप केलेली रक्कम- 67,97,74,78,292.76

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

News Desk

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी!

News Desk

“माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरचे आरोप”, प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

News Desk