HW News Marathi
Covid-19

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार | अजित पवार

मुंबई | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित केला गेला. गेल्या दोन महिन्यापासून देशात सर्व कामकाज ठप्प आहे. यामुळे राज्यात मोठे आर्थिक संकट आले आहे. कोरोनामुळे राज्यात आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार देखील लवकरच पॅकेज देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज (२९ मे) औंध ते काळेवाडी साई चौक इथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन वेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “पॅकजेसंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय होणार आहे. मध्यंतरी २१ लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पाहायला मिळाले. गरीब जनतेला ही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहे.” परराज्यातील मंजूर त्यांच्या गावी गेल्याने त्यांची वाट बघण्यापेक्षा राज्याती मगासलेल्या भागातील तरुणाने काम मिळविण्याचा प्रयत्न करावा, त्याला जर काही काम करण्यास इच्छुक आहे. तर त्याला प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार सुनिल शेळकेंची चिठ्ठी असेल तरच मिळणार लस ! मावळमध्ये अजब प्रकार  

News Desk

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk

नाशिकवरून ८४५ लोकांना घेऊन ट्रेन उत्तर प्रदेशला रवाना

News Desk