HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडीची सत्ता आली अन् दलित,शोषित घटकावर अत्याचार वाढल्या! – राम सातपुते

मुंबई | फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने मत मागून, इथल्या वंचीत शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आज (४ फेब्रुवारी) दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणलीये, आमदार राम सातपुते म्हणाले. यासंदर्भात सातपुतेंनी ट्वीटवर व्हिडिओ ट्वीट करत  या घटनेचा निषेश केला आहे. 

अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. गावातील सरपंचांनी हेतू पूरस्पर पाण्याचे कनेक्शन तोडले आहेत. जीवघेण्या थंडीत आमच्या आई बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिले. हा फक्त पाण्याचा पुरता विषय नाही. हा सरळ सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात. हा मोठा गुन्हा आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजेत.

वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हा भोंगळ प्रकार कुणाच्या आशिर्वादानं सुरू आहे?आघाडीची सत्ता आली की दलित,वंचित, शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात.ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता लवकरात लवकर संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे, असेही सातपुते त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणाले आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

News Desk

नक्षली हल्ल्यातील शहीद जवानांना मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk

मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचा इशारा

News Desk