HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेने उन्माद पसंत पडलेला नाही, सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात !

मुंबई | “जनतेने उन्माद पसंत पडलेला नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपवर टीका केली आहे. पवारांनी पुढे असे देखील म्हटले की, “सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असे म्हणत शरद पवारांनी उदयनराजे भोसलेंवर टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (२४ ऑक्टोबर) लागत आहे.

या विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांकडून जे सांगण्यात आले की ‘अबकी बार २२० पार’, हे लोकांनी स्वीकारलेले नाही. सत्तेचा उन्माद जनतेला पसंत पडलेला नाही. सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात, हे या निकालावरून लक्षात येते., असे म्हणत पवारांनी भाजपला टोला लगावला. निवडणुकीत किती टोकाची मते मांडायची याला काही मर्यादा असते. पण यावेळी प्रचाराची सीमा विरोधकांकडून ओलांडली गेली. जे पक्ष सोडून गेले आणि निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उभे राहिले, त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला नाही, असे पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले.

तसेच साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठ न ठेवणाऱ्यांना जनतेने पराभव करून धडा शिकविला आहे. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे म्हणत पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच पक्ष सोडून गेल्या सर्वांच यश मिळाले नाही, असे म्हणत पवारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यावर टोला लगावला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कराडमधील कृष्णा नदीवरील ब्रिटीशनकालीन पूल कोसळला

News Desk

मॉडेलला दिल्लीला जायचे होते, पोहचली तुरूंगात: पोलिसांसोबत केली मस्करी

News Desk

‘काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा,’ स्वबळाच्या घोषणेवरुन प्रफुल्ल पटेल संतापले!

News Desk