HW News Marathi
महाराष्ट्र

नाणार प्रकल्प आता रत्नागिरी ऐवजी ‘इथे’ येणार

मुंबई गेल्या अनेक दिवसांपासून नाणार प्रकल्पाबाबत अनेक वाद सुरु आहे. हा प्रकल्प रत्नागिरी येथे उभारण्यात येणार होता. मात्र, आता हा नाणार प्रकल्प रत्नागिरीऐवजी रायगडमध्ये उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१९ जून) माहिती दिली आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्येच मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

रायगड येथे हा प्रकल्प उभारण्यास येथील स्थानिक नागरीकांचाही विरोध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत हा प्रकल्प रद्द झाला, असे सांगितले होते. लोकसभा निवडणुकांपूर्वी हि माहिती दिली होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरांत जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणजे खनिज तेल शुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा हा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार होता. ह्या प्रकल्पांसाठी १६००० एकर जमीन संपादित केली जाणार होती. मात्र आता नाणारमधून हटवून ही रिफायनरी आता रायगड जिल्ह्यात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढीव वीजबील प्रकरण : राज ठाकरेंनी उर्जामंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे दिले आदेश

News Desk

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk

मनसुख हिरेन प्रकरण: वसई-विरार मध्ये कुठलाही गुन्हा घडला की माझा संबंध जोडणार का? – धनंजय गावडे

News Desk