HW News Marathi
महाराष्ट्र

नवजात मुलीला मातेनेच जिवंत पुरले

कोल्हापूर – मुलीला जन्म दिला, तर घरी नांदविणार नाही, अशी धमकी पती आणि सासरच्यांनी दिल्यामुळे घाबरलेल्या ओल्या बाळंतिणीने एक घृणास्पद कृत्य केले. आपल्या आईच्या साहाय्याने तिने चक्क पोटच्या नवजात मुलीला जिवंत पुरले. कोल्हापुरातीलगडमुडशिंगीत ही हृदयद्रावक घटना घडली.

दरम्यान, याची माहिती मिळताच त्या तान्हुलीला खड्ड्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात ले आहे. गांधीनगर पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.

सारिकाचा विवाह लखन मोरेशी झाला होती. लखनला पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत. मुली झाल्याने नाराज झालेल्या लखनने पहिल्या पत्नीला माहेरी धाडून दिलं होतं. मुलगा हवा असल्याने त्याने सारिकाशी लग्न केलं. मात्र सारिकालाही पहिली मुलगी झाल्याने लखन प्रचंड चिडला होता. यामुळे दुस-यांदाही मुलगी झाली तर तुला नांदवणार नाही, अशी धमकीच त्याने पत्नीला दिली होती.

आईच्या घरी बाळंतपणासाठी आलेली सारिका आणि तिची आई मुलगा जन्माला यावा, यासाठी प्रार्थना करत होत्या. पण पुन्हा मुलगी जन्माला आल्याने त्या घाबरून गेल्या. आणि सारिकाने आपल्या आईच्या मदतीने मुलीला पोत्यात भरुन रेल्वेरुळाजवळ खड्डा खणून त्यात पुरलं. परिसरातील लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात वर्दी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून मुलीला बाहेर काढले आणि दोघींविरुद्ध गुन्हे नोंदविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हत्तीची चाल, वजिराचा रुबाब म्हणजेच ‘लोकप्रिय नेता’ शरद पवार – सामना

News Desk

“तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले  

News Desk

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज घेणार राज्यपालांची भेट

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

धक्कादायक ! गियर म्हणून चक्क बांबूचा वापर

News Desk

पुण्यात चोविस तासाच दोन ठिकाणी गोळीबार

News Desk

पुण्यातील प्राध्यापकाची इराणी विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

News Desk