HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे ते आदेश अद्याप पोचलेच नाही

मुंबई परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आपण संबंधिताना दिले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागच्या आठवड्यात वर्षावर पत्रकरांशी बोलताना दिली होती. परंतु प्रत्यक्षात असे आदेश आम्हाला मिळालेले नाहीत अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

कोकणात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले.परतीच्या पावसाने उभे पीक कुजून गेले.किड तर मोठ्या प्रमाणात पडली आहे. अजूनही परतीचा पाऊस थांबलेला नाही.नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामें करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतीच केली होती.

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडवणीस यांनी मागच्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना दिली होती.

याबाबत बोलताना सिंधुदुर्ग जिल्हयाचे कृषी अधिकारी नातू म्हणाले,पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला अद्याप आदेश आलेले नाहीत.त्यामुळे पंचनामे सुरू केलेले नाहीत.

ते पुढे म्हणाले, यावेळी भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.मी स्वतः मालवण तालुक्यातील धामापूर गावात भात शेती केली आहे. परंतु त्यावर कीड पडून भात जमिनीवर पडून भात रुजून आले..त्यामुळे भात शेती कापायचीच नाही असे आपण ठरविले आहे असा स्वतःचा अनुभव कृषी अधिकारी नातू यांनी बोलतांना सांगितला.पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांत सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे”, बाळा नांदगावकरांची राजू पाटील यांच्यासाठी फेसबूक पोस्ट

News Desk

“माणसाने लॅविश राहू नये का?”, भाजपच्या ‘त्या’ आरोपांना उर्जामंत्र्यांचे प्रत्युत्तर  

News Desk

भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली तरी मुक्ती मिळणार नाही!

News Desk