HW News Marathi
Covid-19

मुंबईत काम करणाऱ्यांना केडीएमसीच्या हद्दीत ‘नो-एन्ट्री’च्या आदेशाला स्थगिती

मुंबई | मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवलीत प्रतिबंध करण्याच्या आदेशाला कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थगिती दिली आहे. अनेक आस्थापनांना कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबईत करण्यासाठी वेळ लागत असल्याने तोडगा निघेपर्यंत प्रवेश बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केडीएमसीच्या आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांना ८ मेपासून कल्याण डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काल (५ मे) आयुक्तांनी दिला होता. कल्याण-डोंबिवलीमध्ये २२८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी आदेश दिला होता. मात्र, अनेक आस्थापनांना कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबईत करण्यासाठी वेळ लागत असल्याने तोडगा निघेपर्यंत प्रवेश बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ८३,८०९ नवे रुग्ण आढळले

News Desk

आपल्या नागरिकांना राज्यात आणण्यास पश्चिम बंगाल सरकारचे सहकार्य नाही !

News Desk

उच्च न्यायालयाच्या तंबी नंतर आता सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला ‘यासाठी’ नोटीस

News Desk