HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | राज्यात राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिफारसीनंतर काल (१२ नोव्हेंबर) राष्ट्रपती राजवट लागू झाली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने दिलेल्या वेळी सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करू शकले नाही. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटी लागू करण्यासाठी ऐवढी घाई केली. यामुळे राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज (१३ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे.

तसेच राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन दिवस दिले होते. तरी देखील भाजपला बहुमत सिद्ध दिलाल्या पुरेशा वेळवरून देखील राज्यपालांवर शिवसेनेनी टीका केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादवरून दोन्ही पक्षात सत्ता संघर्ष सुरू होता. भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नव्हते. शिवसेना ही मुख्यमंत्री पदावरून हटून बसलेली. न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी होईल. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि वकिल कपिल सिब्बल हे शिवसेनेच्या वतीन सर्वोच्च न्यायलयात बाजू मांडणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईवर अद्यापही मुसळधार पावसाचं सावट, आकाशात काळ्या ढगांची गर्दी

News Desk

“आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार”

News Desk

पेट्रोल पंप तपासणी मोहीम सुरु

News Desk