HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : राज्यातील सरकारी कार्यालये ७ दिवसांसाठी राहणार बंद ?

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालये पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य कॅबिनेट घेतला आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (१७ मार्च) कॅबिनेटची बैठक बोलविली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व सरकारी कार्यालये सात दिवसासाठी बंद ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, कॅबिनेटच्या बैठकीत अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहणार आल्याची माहिती मिळलाी आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक सुरू आहे. या बैठकीत मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन देखील आठवड्याभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाल आहे. या बैठकीत लोकल ट्रेन, मेट्र आणि बस आठवड्याभरासाठी राज्याची कॅबिनेट बैठक अद्याप सुरूच आहे.

दरम्यान, रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते, यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून मध्य-पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयावरून ५० रुपये केले आहे. तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्यासाठी मुंबई-पुणे-मुंबई, निझामाबाद, नागपूर-मुंबई, पुणे-नागपूर, भुसावळ-नागपूर यासारख्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, २ जणांचा मृत्यू

News Desk

“साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे ही टंचाई आली”- एकनाथ खडसे

News Desk