HW News Marathi
महाराष्ट्र

“साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे ही टंचाई आली”- एकनाथ खडसे

जळगाव | महाराष्ट्रात सध्या शेतकरी अडचणींमध्ये सापडला आहे. कुठे पीकाला योग्य भाव मिळत नाही तर कुठे युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फडणवीस सरकारच्या काळात कृषीपद ज्यांनी सांभाळले त्या एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊ दिली नाही” असे खडसेंनी म्हटले आहे.

“सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप देखील एकनाथ खडसे यांनी आघाडी सरकारवर केला आहे.

“ मी ५ वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी समन्वय होता. नीटनेटकेपणाने त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले होते. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही”, असे म्हणत खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत…”, गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna

शिवसेनेनंतर आता मनसेचा डोळा गुजराती मतांवर ….

News Desk

खुशखबर ! बेस्टची भाडेवाढ नाही

News Desk