HW News Marathi
महाराष्ट्र

Cyclone Nisarg : नुकसान झालेल्यांना योग्य भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल !

मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्वांना योग्य भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलेल आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार हे आज (९ जून) चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पाहाणीसाठी आले आहेत. यावेळी शरद पवार यांनी चक्रीवादळामुळे माणगावात नुकसान झालेल्या घरांची पाहाणी केली. चक्रीवादळामुळे माणगावातील अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून अतोनात नुकसान झाले आहे. या वादळात छपर उडाल्याने लोकांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे.

माणगांव शहरात गेले ८ दिवस वीज व पाणी नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा गेले ८ दिवस बंद आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता. मात्र जनरेटर लावून तो तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला आहे. या पाहाणी दौऱ्यानंतर आढवा बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्व योग्य ती भरपाई मिळवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून पाठपुरावा करू, असे ग्वाही शरद पवार यांनी ग्रामस्तांना दिली आहे.

या सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण होतील. काळजी नको मी सर्व पाहतो, असे आश्वासंन शरद पवारांनी माणगावकरांना दिले. शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आ. भरत गोगावले, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, माणगांव तालुका रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडीची ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

News Desk

स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून ‘महाराष्ट्र’ देशात अव्वल

News Desk

“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

News Desk