HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेच्या उमेदवारीवर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा आक्षेप

मुंबई | नारायण राणे यांनी भाजपकडून राजसेभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. येत्या २३ मार्चला राजसभेसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून ६ जागेवर राजसेभेसाठी उमेदवार देण्यात येणार आहे. नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन हे तीन जण भाजपकडून राजसभेचे उमेदवार आहेत.

नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. राण्यांनी कोणत्या पक्ष्याच्या वतीने राजसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. या अर्जात कोणत्या पक्षाचे नाव लिहले आहे. ते असे आव्हान शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केले आहे.

तसेच राणेंनी भाजपमध्ये कधी प्रवेश केला. त्यांची पावत आहे का?, जर त्यांनी भाजपचे सदस्य म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल, तर राणेंनी त्यांच्या स्वाभिमान पक्ष्याचा राजनामा दिला का? असे अनेक प्रश्न शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणेंच्या उमेदवारीवर प्रश्न चिन्हे उपस्थित राहत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

News Desk

भाजपकडून विधान परिषदेसाठी डच्चू ; तर पंकजा मुंडे म्हणतात…

News Desk

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

News Desk