HW News Marathi
महाराष्ट्र

“….तर मास्क काढून बोलतोय”, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात काढला मास्क!

नाशिक। गेल्या अनेक दिवसांपासून कहर केल्याने सर्वच ठिकाणी नियम निर्बंध लागू करण्यात आले होते मास्क देखील सगळ्यांनाच बंधनकारक करण्यात आल्यानंतर देखील परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे, अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाषण करताना आपला मास्क काढला आणि भाषण केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच मास्क काढल्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाल्या त्या लक्षात येत मुख्यमंत्री म्हणाले बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून बोलतो आहे. मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विविध विकासकामांचे उद्घान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थित नागरिकांमध्ये कुजबुज सुरु झाली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमधील विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मास्क काढला होता. जाहीर कार्यक्रमात मास्क काढल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये कुजबुज सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या हे लक्षात आलं आणि आज पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्क काढला, बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कामाच्या कौतुकासाठी शब्द नाहीत

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, माझे राज्य पुढे कसे जाईल हा विचार करणे ही संघभावना आहे. महाराष्ट्र पोलिस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला आहे. आपल्या पोलिसांमध्येही क्रीडा राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. त्यांच्या जिद्दीला दिशा देणे, सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. क्रीडा स्पर्धेतील यशासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीबाबत पोलिसांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. शिस्तबद्ध संयोजनाने आणि झालेल्या कामाने आपण भरावरून गेलो, कामाच्या कौतुकासाठी शब्द नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अकादमीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांसमोरच कार्यकर्ते आपापसात भिडले

News Desk

देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व,कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक – अजित पवार

News Desk

अंघोळीची गोळी संस्थेला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

News Desk