HW News Marathi
Covid-19

राज्यात आता ५ कोरोना हॉटस्पॉट, राजेश टोपेंची माहिती

मुंबई। महाराष्ट्रात १४ हॉटस्पॉट होते ते आता पाच वर आले आहेत, ही दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता राज्यात मुंबई, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, नागपूर आणि मालेगाव ही पाच हॉटस्पॉट राहिली आहेत, असे आरोग्य मंत्र्यांनी आज (२२ एप्रिल) फेसबुक लाईव्हद्वारे देशातील जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.

राज्यात सध्या ७ हजारांपेक्षा जास्ट टीम हे सर्वे करत आहेत. त्यामुळे कुणीही घाबरुन जाऊ नये असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केल आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ९० हजाराच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत ३ हजार ६८३ इतके रुग्ण आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. राज्यात ३८ लॅब मध्ये ७ हजारांपेक्षा जास्त टेस्ट होत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. एकही मृत्यू होऊ नये, यासाठी राज्यात सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाची लक्षणे दिसत असेल तर डॉक्टरांकडे जा

समजा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर त्याठी आपण सगळी तयारी करतो आहोत. धारावीसारख्या ठिकाणी लोकांना होम क्वारंटाइन शक्य नाही. त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरून नका, लक्षणे दिसत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा,बरेच रुग्ण अगदी शेवटच्या स्टेजला येतात. त्यामुळे कोरोनाच्या लक्षणेंकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळी उपाय करणे कठीण होऊन बसते. हे घडू नये म्हणून थोडीही लक्षणे दिसली तरीही फिव्हर क्लिनिकमध्ये जा, असे आवाहन राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केले.

टोपेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

८३ टक्के लोक हे सृदृढ आहेत त्यांच्यात लक्षणे नाहीत हे सगळे चित्र आशादायी आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये असेही मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगेन असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.

• कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे, तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.

• राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

• महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

• राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

• कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई किटची गरज भासू नये यासाठी फोटो बूथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

• प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.

• मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.

• कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. जर समजा कुठलीच उपाययोजना केली नाही तर काय होईल यासाठी गणितीय गृहितकावर आधारित रुग्णसंख्येची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना रुग्णसंख्या १० लाखांच्या पुढे

News Desk

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk

Murlidhar Mohol HW Exclusive : दाट लोकवस्तीमधील लोकांचे स्थलांतर करून कोरोनाचा संसर्ग कमी करणार !

News Desk