HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

मुंबई | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण पुण्यात अढून आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोनाबाबत अनेक अफवा सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पसवल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून ज्या ठिकाणी लोक मोठ्याप्रमाणात जमतील अशी कार्यक्रम टाळण्याचा विचार सुरू आहे. यात आयपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या स्पर्धा स्पर्धांना परवानगी द्यावी की नाही याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच कोरोनाच्या मुद्द्यावर आज (११ मार्च) दुपारी २ वाजा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएल आणि कोरोनाशी संबंधित विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा लवकर घेऊन शाळांना लवकर सुट्टी देण्याबाबत आणि राज्य विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्यावर चर्चा होऊ शकते, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच कोरोना बाधित रुग्णांसाठी वेगळे वॉर्डही तयार केले जात आहेत. कोरोनाबाबत जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक!

News Desk

दिलासादायक! रत्नागिरीत ४ दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

News Desk

ठरलं! अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार जाणून घ्या…

News Desk