HW News Marathi
महाराष्ट्र

आरक्षणात बदल होणार नाही | तावडे

मुंबई | महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसात दलित आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये असलेले मंत्री १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवाद करताना काय आश्वासन देणार याकडे सर्व दलित जनतेचे लक्ष लागले असताना आरक्षणात कोणताही बदल होणार नाहीत असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी चैत्यभूमी येथे बोलताना दिले.

यावेळी बोलताना तावडे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्यघटनेमुळे गिरणगावातली मी मंत्री होतो चाय विकणारे सामान्य नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतात हे सर्व बाबासाहेबांमुळे शक्य झाले. त्यामुळे बाबासाहेबांनी दलितांना मिळवून दिलेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. राज्य सरकारने डॉ आंबेडकरांचे लंडन मधील घर विकत घेतले आहे. डॉक्टर आंबेडकरांशी निगडीत असलेल्या पाच स्थळांना राज्यसरकाराने पंचतीर्थ म्हणून घोषित केल्याचेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री दरवर्षी नागपूर स्थित दिक्षाभूमीला जाऊन अभिवादन करतात त्यामुळे ते आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत असेही यावेळी बोलताना तावडेंनी आवर्जून सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा!

News Desk

राज्यात रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी फेसबुकचे सहकार्य घेण्यात येणार

News Desk

खडसे, महाजन यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, प्रफुल्ल लोढा यांचा गंभीर आरोप

News Desk