HW News Marathi
महाराष्ट्र

बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत होणार | मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या नियोजित जागेची पाहाणी केली. १४ एप्रिल २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून पुढील वर्षापासून काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे मुख्यमंत्री म्हटले. तसेच इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्य स्मारक असेल. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकास स्मारकाच्या भव्य उंचीमुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरु नही दर्शन घेता येईल. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे.

मुख्यमंत्री या जागेची पाहाणी करताना त्यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान, स्मारकाचे वास्तू विशारद आणि प्रभू असोसिएट्सचे शशी प्रभू आदी मंडळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलडाण्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

“हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका

Aprna

“सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?”, सामनातून भाजपला सवाल

News Desk