HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात पुढच्या 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट? टास्क फोर्सने खरंच असं सांगितलंय? सत्य काय ?

मुंबई । कोरोना ची दुसरी लाट आता संपुष्टात येत असल्याचं चित्र आहे. तसंच राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आता वाढलय. अशातच राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे बोलले जात आहे. मात्र राज्याने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने काय सांगितले ते आपण पाहूया.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आता तयारी करतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे, मात्र ही तिसरी लाट कधी येणार यावरून अनेक उलट सुलट चर्चा व्यक्त होतायेत आणि महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

पुढील 2 ते 4 आठवड्यात कोरोना ची तिसरी लाट येईल असं कधीच सांगितलं नसल्याचं टास्क फोर्सने नमूद केलंय.

महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्या संबंधीच्या सूचना किंवा इशारा नसल्याचे सांगितले आहे. मात्र तिसरी लाट आल्यास आपण तयार असले पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय.

2 ते 3आठवड्यात कोरोना ची तिसरी लाट येत असल्या तर सांगून तुम्ही लोकांना घाबरवता आहात का? तुमच्याकडे पुरावे आहेत का? असं विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं की, ” आम्ही लोकांना घाबरवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये, आमच्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारी संदर्भातली ही चर्चा झाली, दोन लाटांमध्ये 100 ते 120 दिवसांच अंतर असतं. पण हे फक्त मॉडेल असून आपल्याला सत्य परिस्थिती पहावी लागते”.

” मॉडेल प्रमाणे पुढे जात जगभरातील इतर देशांचा अभ्यास करून इतर लाटा कशा असतील याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. या संबंधित ही पूर्ण चर्चा झाली होती. लाट लवकर आल्यास आपण तयारीत राहिलं पाहिजे इतकीच चर्चा झाली असून त्यापेक्षा अधिक काहीही नाही”.

अंदाज बांधणे मात्र कठीण

” अमेरिकेत दोन लाटांमध्ये 14 ते 15 आठवड्यांचे अंतर आहे. तर या उलट युकेत 8 आठवड्यांपेक्षा कमी अंतर आहे. आपल्याकडे डेल्टा विषाणू असल्याने तयारीत राहण्याची गरज मात्र आहे. आम्ही कधीही 2 ते 4 आठवड्यात कोरोना ची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलेलं नाही असा अंदाज लावणं चुकीच आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

ठिकठिकाणी लोक गर्दी करत असून सुरक्षेच्या नियमांचं पालन होत नसल्या संबंधित देखील विचारण्यात आलं होतं. ” तिसऱ्या लाटे साठी कोणतीही अशी वेळ नाही मात्र आपण सर्वांना करुणा संबंधीच्या सूचना आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करायला हव लोकांनी घराबाहेर पडताना डबल मास्क वापरला पाहिजे.”

असं सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायलचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

News Desk

अमित शहांच्या कोरोना रिपोर्टबद्दल संभ्रम !, गृहमंत्रालयाने फेटाळले वृत्त

News Desk

पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार

News Desk