HW News Marathi
देश / विदेश

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबणार

मुंबई | राज्यातील शेकतकरी दुष्काळाची झळ सोसत असून बळीराजा मान्सूनची मोठा अतुरतेने वाट पाहत आहे. मात्र यंदा मान्सूनला विलंब होण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे. मान्सून राज्यात ८ जूनपर्यंत दाखल होणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे.

यंदा अंदमानच्या समुद्रात दाखल झालेला मान्सून उत्तर दिशेला किंचितसा पुढे सरकला असून तो १ जून रोजी म्यानमार आणि श्रीलंकेत दाखल होईल. तर केरळमध्ये पोहोचण्यास ६ जून उजाडणार आहे. त्यामुळे मुंबईत सर्वसाधारण ९ जूननंतर मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून लांबल्याने उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. १ जूनपासून पूर्व विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. बळीराजाची चिंता यामुळे वाढणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नसून शेतीची कामे पूर्व करून घ्यावीत आणि हवामाना विभागाच्या सल्ल्यानुसार शेतीचे पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र व मध्यप्रदेश दुस-या क्रमांकावर  

swarit

सामान्यांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा फटका

News Desk

आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?

News Desk