HW News Marathi
महाराष्ट्र

जीएसटी रिटनसाठी तीन महिन्यांचा कालावधी

छोटया व मध्यम व्यापा-यांकरीता जीएसटी अंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत जीएसटी कॉन्सिल मध्ये मागणी करणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जीएसटी अंतर्गत प्रत्येक व्यापा-याने प्रत्येक महिन्यात त्याच्या विक्री, खरेदीचा पूर्ण तपशिल तसेच तपशिलावर आधारित विवरणपत्र दाखल करणे करणे आवश्यक आहे. छोटया व मध्यम उलाढाल असलेल्या व्यापा-यांनी या संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रत्येक महिन्यात सर्व तपशिल भरणे ही अधिक कालापव्यय करणारी व खर्चिक बाब आहे असे निवेदन देत आपली भूमिका विशद केली. व्यापारी बांधवांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिनिधींना जीएसटी अंतर्गत सर्व व्यापा-यांनी करासंदर्भात अनुपालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी छोटया व मध्यम व्यापा-यांचा जीएसटी अंतर्गत अनुपालन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याऐवजी त्रैमासिक विवरण भरण्याचे प्रावधान जीएसटी कायद्याअंतर्गत करावे अशी मागणी येत्या 6 ऑक्टोबर 2017 रोजी होणा-या वस्तू व सेवा कर परिषदेत करण्याची ग्वाही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी शासनाकडून एसटीसाठी १००० कोटींचे पॅकेज जाहीर

News Desk

‘महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची स्थिती, आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय’, शरद पवारांनी व्यक्त केला संताप

News Desk

“सत्तेसाठी लाचारी म्हणजे नारायण राणे”- विनायक राऊत

News Desk
महाराष्ट्र

अठरा शेतक-यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत 

News Desk

मुंबई:-कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणा-या यवतमाळमधील १८ शेतक-यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारण्यात येणा-या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकºयांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतक-यांवर उपचार सुरु असून २५ शेतक-यांना अंधत्व आले आहे.

यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकºयांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाºयांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related posts

राज्याला रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार पण…

News Desk

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

लतादीदींच्या जाण्याने देशात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली! – नरेंद्र मोदी

Aprna