HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून सत्ता स्थपानेचा दावा नाही, विलंबाबाबत राज्यपालांशी चर्चा !

मुंबई | “भाजपकडून सत्ता स्थपानेचा दावा केला नाही, तर सत्ता स्थापनेच्या विलंबाबाबत राज्यपालांशी चर्चा,” केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यातील राजकीय माहिती राज्यपालांना देऊन घटनात्मक तरतुदीविषयी चर्चा केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. “पुढे काय करायचे यांची रणनिती ठरवू,” असे पाटालांनी यावेळी राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले. मात्र, या परिषदेत पाटांनी पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर देणे टाळले.

तसेच “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे,” असे पाटील यावेळी म्हणाले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (७ नोव्हेंबर) राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटीदरम्यान उपस्थित होते. या भेटीनंतर भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात होणाऱ्या सत्ता स्थापनेच्या विलंबाबाबत राज्यापालांशी चर्चा केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन  कार्यवाही केली असती तर…

News Desk

नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये अचानक लागली आग

Aprna

एमएसईबीचे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

News Desk