HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जाला कंटाळून यवतमाळच्या शेतक-याची आत्महत्या

यवतमाळ | महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात एका शेतकऱ्याने आपल्या आत्महत्येला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण अजून सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका शेतक-यांने शनिवारी आत्महत्या केली.

उमरखेड तालुक्यामधील सावळेश्वर येथील माधव शंकर रावते या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने शनिवारी शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. शनिवारी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली.

सावळेश्वर हे गाव अत्यंत दुर्गम भागात असल्याने दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस येताच शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली. माधव रावतेंकडे असलेल्या ४ एकर कोरवाहू शेतीत सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापूस झाला होता. त्यामुळे रावते आर्थिक संकटात होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या रावतेंनी शनिवारी आपली जीवन यात्रा संपवली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

News Desk

“मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस होती, पण आता काय हाल चाललेत तुम्हीच बघा”, पटोलेंचा पंकजा मुंडेंना टोला

News Desk

“दरेकरांचं जाकिट बघून कोरोना म्हटला असेल जाकीटातून कुठे आत शिरु” -अजित पवार

News Desk