HW News Marathi
Covid-19

औरंगाबाद जिल्ह्यात १, ११७ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासारख्या कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या शहरांनंतर आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता १, ११७ वर पोहोचला आहे. आज (२० मे) औरंगाबादमध्ये नवे ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ महिला तर २५ पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाटयाने वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमध्ये वाढणाऱ्या आकड्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. त्याचप्रमाणे, येथील नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचा आकडा १००० च्या पार गेल्याने आता जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देणे आणि खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. येथील बऱ्याचशा जणांना एकमेकांच्या संपर्कात आल्यानेच संसर्ग झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. औरंगाबादमधील कंटेन्टमेंट झोन्समध्ये सतत महसूल अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचना आणि आदेशांचे लोकांनी देखील काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुंबई पुण्याहून गावाकडे जाणाऱ्या लोकांमुळे गावात कोरोनाचा संसर्ग आणखी पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. आज बीडमध्ये वाढलेले सर्व नवे ८ कोरोनाबाधित मुंबई-पुण्याहून आलेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशमूर्तींची उंची ४ फुटापर्यंतचं ! मुर्तीची उंची नव्हे भक्ती महत्वाची …

Arati More

महाराष्ट्राला देशात कोरोनामध्ये एक नंबर वर नेणारा माणूस आमदार झाला

News Desk

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk