HW News Marathi
महाराष्ट्र

मागण्या मान्य न झाल्यास दुकाने उघडी ठेवणार, व्यापारी संघटना आक्रमक

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार संपूर्णतः दुकाने बंद राहतील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची आशंका आता दर्शवली जात आहे आणि निर्बंध शिथिल करण्याचा सरकारचा काहीच इशारा अद्याप नाही. व्यापारी वर्गाने सरकार पुढे दुकाने संपूर्ण वेळ चालू ठेवण्याची मागणी केली असून सरकारने त्याला मान्यता दिली नाही, आणि म्हणून आता व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे.

व्यापारांकडून सरकारला इशारा

व्यापारी वर्गाच्या मागण्या सरकारने फेटाळल्याने आक्रमक व्यापाऱ्यांनी आता सरकारला इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास, या शनिवार आणि रविवारीसुद्धा सुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला असून नियमांमध्ये शिथिलता मिळत नसल्यानं व्यापारी आक्रमक झाले आहेत. नियमांमध्ये शिथिलता न मिळाल्यास वोटिंगवेळी दाखवू, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी सरकराला इशारा दिला आहे.

सरकारने दुकानांबाबत लादलेल्या निर्बंधांमुळे दादर व्यापारी संघ आक्रमक झाला आहे. शनिवार रविवार अनेकांना सुट्टी असताना ज्या दिवशी लोक खरेदीला येतात. त्याच दिवशी दुकान बंद असल्याने याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे. शिवाय, सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने ही वेळ ७ ते ७ तरी किमान वाढवून द्यावी अशी मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे.

कोल्हापुरात व्यापारी आक्रमक

कोल्हापुरात व्यापारी वर्ग आक्रमक झाल्याने सरकरने काही दिवसांसाठी निर्बंध शिथिल करून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. कोल्हापुरातील व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाच दिवसांची मुदत दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत..मात्र व्यापाऱ्यांच्या काही संघटना दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत… पाच दिवसांमध्ये कोल्हापूर शहरात पॉझिटीव्हीटी रेट वाढला नाही, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे… त्यामुळे आम्हाला सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीतील ओबोसी मोर्चाला काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती

News Desk

औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?

News Desk

इंदापूर तालुक्यात एका महिलेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचीच पकडली कॉलर

News Desk