HW News Marathi
Covid-19

३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार असल्याच्या सर्व बातम्या चुकीच्या, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल सेवा बंद आहेत. आणि त्या कधी सुरू होणार यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.३० सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी व्हॉट्सअॅपवर वायरल झाली होती. या बातमीमुळे मुंबईसह देशभरातील प्रवाशांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करुन ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात अजूनही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट सांगितले आहे.

पूर्व रेल्वेचे एक पत्र काल (१० ऑगस्ट) व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे, भारतीय रेल्वे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्या पत्राच्या आधारे काही वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या वेबसाईटवर ३० सप्टेंबरपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशा बातम्या दिल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. लोकल आणखी ५० दिवस धावणार नसल्याने, रस्ते मार्गाचा वापर करुन ऑफिसला जाणे त्यांना परवडणारे नाही आहे. लोकांच्या या संतपावरून रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

“काही वर्तमानपत्रांनी चुकीच्या बातम्या देऊन रेल्वे सेवा ३० सप्टेंबरपर्यंत लोकल धावणार नाहीत असे सांगितले आहे, मात्र ते चुकीचे असून असे कोणतेही परिपत्रक आम्ही जारी केलेले नाही”, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. यासोबतच पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या सुरु असलेल्या स्पेशल एक्स्प्रेस गाड्या सुरु राहतील, असे ट्विट केल्यामुळे ट्रेन बंद राहणार की सुरू राहणार या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.

२२ मार्चपासून देशातील रेल्वे सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशामध्ये २०० विशेष एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या. तसेच ३० राजधानी विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलेला नाही. त्यामुळे रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे, अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे आणि वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई लोकलही केवळ सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधील संताप हळूहळू वाढत आहे. लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेवा लवकर सुरु कराव्यात या संदर्भात रेल्वे मंत्रालयावर देखील दबाव वाढत चालला आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाला यावर आता लवकरच निर्णय घेणे भाग पडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झाल्यावर आनंदाचा व भयमुक्त गोपाळकाला साजरा करू – धनंजय मुंडे

News Desk

कोरोना चाचणी फक्त‘या‘ लोकांचीच होणार !

News Desk

“महाराष्ट्र सरकारमुळे देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला बसला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारलं

News Desk