HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगावत रॅलीला हिंसक वळण

मुंबई। त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली आज ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.

यात जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे रॅलीला हिंसक वळण आलं. यामुळे जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळाली आहे.

मालेगाव

मालेगाव येथे त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून बंद पाळ्यात आला होता. परंतु, रॅलीत मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला होता. यावेळी जमावाने पोलिसांवर दगड फेक केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

भिवंडी

मुस्लिम समाजानं भिवंडीत बंद पुकारला होता. आणि या बंदाला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

News Desk

काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

News Desk