HW News Marathi
Covid-19

जनता कर्फ्यूप्रमाणेच नागरिकांनी आपली पुढची जीवनशैली बदलावी – तुकाराम मुंढे

नागपूर | राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूपमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काल (२५ जुलै) आणि आज (२६ जुलै) जनता कर्फ्यू लागू केला होता. याला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असे नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. टिव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी “नागरिकांनी दोन दिवस जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आणखी पुढचे काही दिवस दिला तर नागपूरात ही वेळ येणार नाही. पण नागरिकांकडून नियमांचे पालन केले गेले नाही, तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल” अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

“जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या दोन दिवसांच्या कर्फ्यूप्रमाणेच नागरिकांनी आपली जीवनशैली बदलावी. नागरिकांनी नियमांचं पालन करावं”, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. “दोन दिवस जनता कर्फ्यू झाला. आता नागपुरात प्रशासनाची कडक नजर राहील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाई केली जाईल”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

उद्यापासून नियमांचे पालन करा, दिलेल्या वेळेत दुकान उघडा, गरज असेल तरच घराबाहेर पडा. मात्र नियमांचे पालन करा. बाजारात फक्त गरजेपुरतेच जा”, असे देखील आवाहन तुकाराम मुंढे यांनी नागपुरकरांना केले आहे. “नागपुरकरांनी तब्येतीची काळजी घ्यावी. जरा जरी लक्षणे आढळली तर प्रशासनाला माहिती द्यावी. काही लोकं तब्येत जास्त बिघडल्यावर येतात. त्यामुळे नागपुरात मृत्यू संख्या वाढली”, असे देखील तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दो गज दुरी’ या मंत्राचा वापर करा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

News Desk

कोरोनाच्या बाबतीत नागरिकांचा आत्मविश्वास वाढला, भीतीत घट! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानाचं वक्तव्य

News Desk

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३६ लाखांच्या पुढे, गेल्या २४ तासांत ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

News Desk