HW News Marathi
Covid-19

कोणाला मंत्रालयात जाण्याचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही ! 

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “कोणाला मंत्रालयात जाण्याचा कंटाळा आलाय म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही”, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कोणाला कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन उठवता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. मी देखील त्यांच्याशी १००% सहमत आहे. महाराष्ट्राची जनता मात्र असं म्हणते कि, कोणाला मंत्रालयात जाण्याचा कंटाळा आलाय म्हणून लॉकडाउन वाढवताही येणार नाही”, अशी बोचरी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

“राज्यातील लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी करण्यात आला नव्हता. त्यामुळे, कोणाला तरी कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन उठवताही येणार नाही. काहीजण लॉकडाऊनला कंटाळले आहेत आणि लॉकडाऊन उठवण्यासाठी आग्रही आहेत म्हणून मी लॉकडाऊन उठवला आणि लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? दारे उघडा म्हणून टाहो फोडणारे ह्याची जबाबदारी घेणार का ?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता. शिवसेना नेते ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या अनलॉक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले होते.

दाराबाहेर बसून दारे उघडा म्हणून टाहो फोडणारे ह्याची जबाबदारी घेणार का ?

“घाईघाईने लॉकडाऊन उठवण्यात काहीही अर्थ नाही. याबाबत जे काही करायचे, ते सावध पावले टाकून करणे आवश्यक आहे. ‘कोरोना’ हे एक जागतिक संकट आहे. केवळ आपल्यावरच हे संकट नाही. संपूर्ण जग या लढाईत एकत्र आहे. जगभरात अजूनही कोरोनावर नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे नाहीत. मात्र, असे असताना दुसरीकडे लॉकडाऊनला विरोध करणारे शहाणे आहेत. मी लॉकडाऊन उघडेन पण दुर्दैवाने लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी ही मागणी करणारे घेणार का ? दाराबाहेर बसून दारे उघडा म्हणून टाहो फोडणारे ह्याची जबाबदारी घेणार का ?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मग राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”, चंद्रकांत पाटलांचा सवाल

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या

Aprna

दिलासादायक ! राज्यात १४ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk