HW News Marathi
महाराष्ट्र

“खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं”, भाई जगतापांची प्रतिक्रिया

मुंबई | महाराष्ट्रात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भाजपचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.

भाई जगताप यांनी “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती त्यांच्या पत्नी काम करतात त्याच बँकेत कशी वर्ग झाली?” असा सवाल केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी तिखट शब्दांमध्ये ट्वीट करत भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच, भाई जगताप यांचा ट्वीटमध्ये एकेरी उल्लेख देखील करण्यात आला होता. त्यावर आता भाई जगताप यांनी खोचक शब्दांमध्ये पलटवार केला आहे. “सत्य जरा जास्त टोचतं”, असं भाई जगताप म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अमृता फडणवीसांचा उल्लेख केला होता. “माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं”, असं भाई जगताप म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांचा चांगलाच तिळपापड झाल्याचं त्यांनी केलेल्या ट्वीटवरून दिसून आलं होतं.

भाई जगताप नेमकं काय म्हणाले ?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.

अमृता फडणवीसांनी काय उत्तर दिलं ?

भाई जगतापांच्या सवालाने व्यथित झालेल्या अमृता फडणवीसांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.त्यांनी ट्विट केले आहे की, ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय !’

भाई जगतापांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत तसेच सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या होत्य.त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत असताना भाई जगताप यांनी आपल्या डॅशिंग अंदाजात अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. आता त्यांचं हे ट्विट वॉर असचं सुरु राहणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाथरुममध्ये पडल्याने अतिरिक्त मुख्य गृहसचिव आयसीयूत

News Desk

राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

धार्मिक तेढ निर्माण होणे ही निराशाजनक बाब, प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली खंत

Aprna