HW News Marathi
Covid-19

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षेसंदर्भात उदय सामंतांचे आयोगाला पत्र

मुंबई | कोरोनाच्या काळात परीक्षेसंदर्भात ज्या शंका होत्या त्या दुर करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही शिक्षण विभागाने जो हेल्पलाईन नंबर दिला होता त्याबद्दल विद्यार्ऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण केले.

अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा विद्यापीठांना घेणे कठीण जात आहे. कोरोनामूळे सामाजिक अतंर ठेवण्यासोबतच इतर निकषांचे पालन करत ८-१० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कठीण होणार आहे. विद्यार्थ्यांचे शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य यांचा विचार करुन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न गेता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ग्रेड प्रदान करण्यात यावी, आणि या पर्यायाला मान्यता द्यावी अशी पत्राद्वारे मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आयोगाकडे केली आहे.

युजीसी प्रत्यंक राज्याला नियमावली देते आणि त्यानुसार प्रत्येक राज्याला परीक्षा घ्याव्या लागतात. मात्र, जर लिहिलेल्या पत्राचा निर्णय युजीसीकडून पोहोचला नाही तर येत्या २ दिवसांमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांची एक बैठक घेण्यात येईल. तसेच, कुलगुरुंशी देखील चर्चा करण्यात येईल आणि पुढे काय करता येईल याचा निर्णय घेण्यात येईल. मात्र, शासनाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा कोरोनामूळे घेऊ शकत नसल्याचे पत्र युजीसीला पाठवले आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

News Desk

राज्यात केवळ २ दिवसांत ७०० रुग्ण कोरोनामुक्त !

News Desk

‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार – अजित पवार

News Desk