HW News Marathi
महाराष्ट्र

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले तर, महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होणार नाही

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज पेटुन उठला आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, एके काळी कधी काळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत

उद्या (८ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

आमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल. जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला, मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो. उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत. ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्याचं नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले, तर महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होईल, असं मला वाटत नाही. एमपीएससी परीक्षा १० तारखेला होणार असल्यानं मराठी मुलांचं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीला छत्रपती संभाजी महाराजही होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण कुठे तरी अडचणीत येताना दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

News Desk

५० टक्क्याची आरक्षणाची मर्यादाही काढावी लागेल, संभाजीराजेंचा केंद्र सरकारला सल्ला!

News Desk

…आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा !

News Desk