HW News Marathi
महाराष्ट्र

“समाजात फुट पाडण्यास सर्व आमदार, खासदारच जबाबदार”, उदयनराजे कडाडले!

सातारा | सध्या निसर्गाचा आणि समाजाचाही समतोल ढासळला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काही दिवसांत संभाजीराजे आणि उदयनराजे भेट घेणार असल्याचं काल त्यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का? यावर उदयनराजे म्हणाले की, कोणी कोणालासोबत घेऊन लढायचे ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मी तर एकटाच लढतोय. निवडणूकीऐवजी स्पर्धा ठेवली तर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. या लोकांना मतदारांची गरज आहे. पण काही प्रश्नांवर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना विचारा, आपण काय केले पाहिजे.

निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत लोकांचे मत विचारात घेतात. निवडून आल्यानंतर आपले मत लोकांना सांगायचे असते. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या चार, पाच किंवा सहा तारखेला पाऊस हमखास पडणार म्हणजे पडणारच. त्यावेळी निसर्गाचा आणि समाजाचा समतोल व्यवस्थित होता. पण आता निसर्गासह समाजाचाही समतोल ढासळलेला आहे. माझे ठाम मत आहे की, समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले आहे. तेच या सगळ्याला जबाबदार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी शपथविधी उरकण्यासाठी मिरची हवन केले होते?

News Desk

मनसेनेचा दणका! अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले

News Desk

राज्य सरकारची लायकी फक्त पोस्टर्स लावण्यापुरती; राज्यात भाजपची सत्ता आणणार! – नारायण राणे

Aprna