HW News Marathi
देश / विदेश

उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची केंद्राच्या अर्थसंकल्पाविरोधात तीव्र नाराजी

मुंबई । मोदी सरकारच्या आज (१ फेब्रुवारी) जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही न आल्याने महाविकासआघाडी सरकारने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेषकरून येत्या काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आल्याची टीका होत असताना अजित पवारांनी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

अजित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, “मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला, अर्थसंकल्पातून भरीव काहीही आलं नसून महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका नजिक असल्यानं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगालला २५ हजार कोटी जाहीर केले, ते मिळतील याची खात्री नाही.”

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अजित पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उघड नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांना थोडक्यातच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “बजेट देशासाठी असायला हवे निवडणुकांसाठी नव्हे. हा देशाचा अर्थसंकल्प आहे निवडणुकांचा नाही. थोडासा वेळ घेऊन मी या अर्थसंकल्पावर निश्चितचव्यवस्थित बोलणार आहे”, असेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला आणि कार सील

swarit

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit

पवारांच्या कामाचा वेग मोठा, पण सरकारला मार्गदर्शन करत नाहीत वाटते !

News Desk