HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील कोरोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत आज महत्वाची बैठक

मुंबई | कोरोनाची राज्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१० एप्रिल) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली केली आहे.

या बैठकीत १०वी आणि १२वीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर चर्चा केली जाणार आहे. काहीही केल्या रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठीच सरकारने गेल्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशावरून व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रि या उमटली होती. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला आहे.

या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. यात करोनाची सद्यस्थिती, लसींचा साठा, निर्बंध शिथिल करणे, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय करायचे यावर विचारविनिमय केला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’, फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका!

News Desk

सोलापूरची घराणेशाही आणि वारसा .

News Desk

“मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही”, चित्रा वाघ याचं स्पष्टीकरण!

News Desk