HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारची ई- पास बाबत आज महत्वाची बैठक

मुंबई | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरात ‘अनलॉक ४’च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारच्या गाईडलाईन्सही जारी होणार आहेत. याअंतर्गत ई-पासबाबत आज (३१ ऑगस्ट) राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
ई-पास संदर्भात राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. कारण, अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात होती. त्यासंदर्भात ही एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RBIच्या संचालक होण्याच्या आमदार, खासदारांच्या प्रतिबंधाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रीया

News Desk

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; संपूर्ण देशाचे लक्ष

Aprna

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

News Desk