HW News Marathi
महाराष्ट्र

कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा – मुख्यमंत्री

मुंबई | कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं काटकोरपणे पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२२ नोव्हेंबर) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातुन राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या राज्यातील स्थितीबाबत माहिती दिली. तसेच, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. २४-२५ कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आगामी कोरोना साध त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

ST बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक! – मुख्यमंत्री

Aprna

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज !

Gauri Tilekar