HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत!

मुंबई | राज्यात २०२० पेक्षा यावर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (११ एप्रिल) टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे. राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. काही सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यामुळे आता लॉकडाऊन राज्यात होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आजच्या टास्क फोर्सच्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत मांडलं आहे. मात्र, टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं आहे. त्यामुळे आता ८ दिवसांचा लॉकडाऊन होणार १४ दिवसांचा होणार हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकाएकी लॉकडाऊनची घोषणा करणार नसल्याची माहिती मिळत आहे. लोकांना १-२ दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. तशी माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिली आहे. लोकांना लॉकडाऊनची आधीच कल्पना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांचे लक्ष आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा मोठा ! तर रिकव्हरी रेट 95.48%

News Desk

जॉन्सन कंपनीच्या ‘सिंगल डोस’ लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार!

News Desk

‘कोरोना’च्या संकटात संयमाचा ‘बारामती पॅटर्न’ दाखवूया-अजित पवार

Arati More