HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान करायला नको होते !

मुंबई | शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची आज (३१ ऑक्टोबर) निवड करण्यात आली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काल (३० ऑक्टोबर) विधिमंडळाच्या नेत्यांची निवड केली आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर आदित्य ठाकरेंचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ते विधान करायला नको होते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. “आपण मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. भाजप अध्यक्ष अमित शाहांबरोबर माझे जे ठरलेय ते करावे एवढेच माझे म्हणणे आहे. आम्ही स्थिर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनौपचारिक गप्पांमध्ये ‘ते’ वक्तव्य करायला नको होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिस्कटलीय. पण मला खात्री आहे सगळे सुरळीत होईल. उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खूप काही अफवा सुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. बैठकीत कोणतीही आक्रमक भूमिका न घेतल्याने, तसेच राज्यात आम्ही स्थिर सरकार देणार असल्याचे म्हटल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

दिवाळी दिवशी मुख्यमंत्री नेमके काय बोले

दिवाळी दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा म्हणाले की, पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार म्हणाले होते. तर अडीच-अडीच वर्षाचा शब्द कधीच दिला नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी दिले. वाटाघाडीत अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा शब्द नव्हता. भजापच्या नेतृत्त्वात सरकार स्थपान होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करी कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अट रद्द करा!

News Desk

राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनकडून दत्तक घेऊन सुद्धा झाला नाही

News Desk

हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसत आहे- देवेंद्र फडणवीस

News Desk