HW News Marathi
महाराष्ट्र

‘वर्षा’ बंगल्यावर बैठका सुरुच, मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ बैठकांतून काय उलगडणार?

मुंबई | अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर गेल्या २ दिवसांपासुन बैठका सुरुच आहेत. दरम्यान, काल (१६ मार्च) रात्री उशिरापर्यंत गुप्त खलबतेही सुरु होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. त्यामुळे वाझे प्रकरणात आता पुढे आणखी कोणते उलघडे होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. काल रात्री साधारण ८ वाजता ही बैठक सुरु झाली होती. ती मध्यरात्रीपर्यंत बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपली खरीप पिकं आता सुरक्षित राहणार !

News Desk

गेल्या ६ महिन्यात माझ्यावर १० अग्रलेख, मला इतकं महत्व राऊत का देतायत?

News Desk

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी सांगितला यशाचा मूलमंत्र

News Desk